तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा लग्नसराई सुरु झाली असेल खान्देशात.
माझ्या लहानपणी, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर लग्नाची गाणी जुळवायची खुप क्रेज होती. त्यावेळचेच हे एक गाणे आठवतेय. एकत्र कुटुंब पद्धती, त्यात लग्नाच्या तारखेच्या ८-१० दिवसांपासुन घरात पाव्हण्या-रावळ्यांचा राबता सुरु व्हायचा. करवल्यांना खास आमंत्रण देउन बोलवले जायचे किंवा भाऊ स्वतः घ्यायला जायचे.. दिवसभर गव्हाची रास पाखडणे, निवडणे, हळद फोडणे ही कामे झाली की रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अंगणात सर्वांनी बसायचे. सगळ्या मुली,वयस्कर बायका बरोबर बसत. अशातच एकेकीला गाण्याचा आग्रह होत असे. एकीने सूर लावला की बाकीच्या तिला साथ द्यायच्या. मग एकमेकींच्या म्हणजे, नणंदांच्या, मामीच्या, वहीनीच्या उखाळ्या पाखाळ्या त्या गाण्यातुन काढायच्या. वहीनी पण हसुन दाद द्यायची त्यावेळेस. मग एखादी नणंद उठायची .. नाचत नाचत भावजईच्या पुढे चुटक्या वाजवत गाणे म्हणायची," वारभर कपडा माले देशी ते सांगाले व्हतं वं सांगाले व्हतं" असं काहीसं एक गाणं होतं.
वडीलधारी मंडळी झोपाळ्यावर बसुन गंमत बघायची. तर नवरा मुलगा...मुद्दाम तिथे चक्कर मारत असे. मग कानावर पडलेल्या ओळींनी स्वतःशीच हसत असत. (इथे नवरी मुलगी असेल तर लाजेने चुर्र होई. मग कधी कधी गाण्यात्,'तुले सासरे जानं पडी... वै." सांगत ...तेव्हा नवरी, नवरीच्या आईच्या डोळ्यात पाणी येइ. )
ओ फिरकीवाली, तु कल फिर आना
नही फिर जाना, तु अपनी मकानसे
बने की शादी है बडी धुमधामसे
चैन तुम तो पेहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन में ठुशी
तु अपनी मकान से....
बने की शादी है बडी..
घडियाल तुम तो ओ पहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन मे ठुशी
तु अपनी मकान से...
बने की शादी है बडी धुमधाम से
माझ्या लहानपणी, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर लग्नाची गाणी जुळवायची खुप क्रेज होती. त्यावेळचेच हे एक गाणे आठवतेय. एकत्र कुटुंब पद्धती, त्यात लग्नाच्या तारखेच्या ८-१० दिवसांपासुन घरात पाव्हण्या-रावळ्यांचा राबता सुरु व्हायचा. करवल्यांना खास आमंत्रण देउन बोलवले जायचे किंवा भाऊ स्वतः घ्यायला जायचे.. दिवसभर गव्हाची रास पाखडणे, निवडणे, हळद फोडणे ही कामे झाली की रात्री चांदण्यांच्या प्रकाशात अंगणात सर्वांनी बसायचे. सगळ्या मुली,वयस्कर बायका बरोबर बसत. अशातच एकेकीला गाण्याचा आग्रह होत असे. एकीने सूर लावला की बाकीच्या तिला साथ द्यायच्या. मग एकमेकींच्या म्हणजे, नणंदांच्या, मामीच्या, वहीनीच्या उखाळ्या पाखाळ्या त्या गाण्यातुन काढायच्या. वहीनी पण हसुन दाद द्यायची त्यावेळेस. मग एखादी नणंद उठायची .. नाचत नाचत भावजईच्या पुढे चुटक्या वाजवत गाणे म्हणायची," वारभर कपडा माले देशी ते सांगाले व्हतं वं सांगाले व्हतं" असं काहीसं एक गाणं होतं.
वडीलधारी मंडळी झोपाळ्यावर बसुन गंमत बघायची. तर नवरा मुलगा...मुद्दाम तिथे चक्कर मारत असे. मग कानावर पडलेल्या ओळींनी स्वतःशीच हसत असत. (इथे नवरी मुलगी असेल तर लाजेने चुर्र होई. मग कधी कधी गाण्यात्,'तुले सासरे जानं पडी... वै." सांगत ...तेव्हा नवरी, नवरीच्या आईच्या डोळ्यात पाणी येइ. )
ओ फिरकीवाली, तु कल फिर आना
नही फिर जाना, तु अपनी मकानसे
बने की शादी है बडी धुमधामसे
चैन तुम तो पेहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन में ठुशी
तु अपनी मकान से....
बने की शादी है बडी..
घडियाल तुम तो ओ पहनो बनाजी
पेहननेवाले है नाराज खुशी
बना के मन मे ठुशी
तु अपनी मकान से...
बने की शादी है बडी धुमधाम से